महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच
झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी लागणारा “१४५” चा
आकडा गाठता आला नाही.या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा व मित्र पक्ष यांनी “महायुती”
च्या माध्यमातून तर कोंग्रेस व राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांनी “आघाडी” च्या
माध्यमातून निवडणूका लढवल्या.निवडणूक निकाल लागल्या नंतर शिवसेनेने पहिली
प्रतिक्रिया दिली ती म्हणजे “सरकार बनवण्यासाठी शिवसेनेचे सर्व पर्याय खुले”आणि या ठिकाणीच खर्या अर्थाने शिवसेना आणि भारतीय जनता
पार्टी यांच्यातील संघर्षास सुरुवात झाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे
मीडिया वर दररोज त्याच त्या वक्तव्याने नवीन
राज्यातील जनता रोजच नवनवीन अंदाज बांधत होती.सुरुवातीची अडीच वर्ष
शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द अमित शहा यांनी मातोश्री वर येऊन दिला होता.
आता तो पाळलाच पाहिजे. सत्तेत समान वाटा व पद ही समान देण्याचे अमित शहा यांनी
मान्य केले होते. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र त्याच वेळी
शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्या बाबत चर्चा झालीच नाही असे भारतीय जनता पार्टी,देवेंद्र
फडणवीस व दस्तुरखुद्द अमित शहा यांनी जाहीर केले. त्यामुळे सत्ता संघर्षाची
तीव्रता अधिकच वाढली. उद्धव ठाकरे यांनी मी शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे
यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शिवसैनिकलाच बसवणार हा शब्द दिला आहे.
त्यामुळे कोणत्या परिस्थितीत आता माघार नाही असे सांगत आपल्या अस्तित्वाचा मुद्दा
केला. त्यांनी भारतीय जनता पक्षा सोबत असणारे अनेक वर्षांचे संबंध संपुष्टात आणत
केंद्रीय मंत्री मंडळात समाविष्ट असणारे शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांना
राजीनामा देण्यास सांगितले.तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी अधिकच वेग
घेतला होता.राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्धव ठाकरे
यांनी जवळीक साधत कोंग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्या करिता विचारणा पवार
यांच्या माध्यमातून करण्यात आली. शरद पवार यांनी स्वत: कोंग्रेस अध्यक्षा सोनिया
गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिति बाबत माहिती देऊन भारतीय
जनता पार्टीला सत्ता स्थापणे पासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात नवीन राजकीय
समीकरणे जुळवावी लागतील असे सांगत सोनिया गांधी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक पाहता कट्टर हिंदुत्ववादी असणार्या शिवसेने बरोबर आघाडी करण्या करिता कोंग्रेस
पक्षात वेग वेगळे मत प्रवाह होते. अनेक कोंग्रेस नेते यांचा या आघाडीला विरोध होता.
मात्र, पवार
साहेब यांनी केली जुळवा जुळव व सत्तेत समाविष्ट होण्या करीता आतुर झालेले काही आमदार
यांच्या मर्जी खातर किमान समान धोरणावर महाआघाडीचे गणित जुळले. भारतीय जनता पक्षाने
या आघाडीस शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षांच्या बहुतांश नेत्यांनी या सर्व घडामोडीवर
प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मुत्सद्देगिरी करीत आपला प्लॅन शेवट पर्यन्त ओपन केला
नाही. परंतु,सत्ता स्थापने मध्ये गर्क असणारे शिवसेना नेते यांच्या डोळ्यासमोर
फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्चीच होती त्यामुळे त्यांची नजर मर्यादित झाली होती. आणि
नेमके याच संधीचा फायदा भारतीय जनता पार्टी ने घेतला आहे. “रात्रीस खेळ चाले”या उक्ती
प्रमाणे भारतीय जनता पक्ष हा आपले सर्वच “सर्जिकल स्ट्राईक” रात्रीस खेळण्यात पटाईत
आहेत.अजित पवार यांनी राष्ट्रवादी कोंग्रेस ला सोडून भाजपा ला समर्थन देत उपमुख्यमंत्री
पदाची शपथ घेतली आणि शिवसेनेच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राज्यातील राजकारणे
वेगळीच दिशा घेतली असून सुप्रिया सूळे यांनी आमचा पक्ष यांनी घर फुटले असल्याचे संगितले
आहे.
आता
पुढील हालचालींवर लक्ष ठेवून भारतीय जनता पार्टी आहे . मात्र शरद पवार यांना हा सर्वात
मोठा धक्का बसला आहे.
असे
असले तरी शरद पवार यांनी दोनच दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकरी प्रश्नासाठीभेट
घेतली होती ,मात्र यावर खरोखरच नेमकी शेतकरी प्रश्नावरच चर्चा झाली होती
का असा प्रश्न निर्माण होतोय.येणर्य काळात अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष कारवाई
करेल ,मात्र महाआघाडीच्या सत्ता स्थापनेस व शिवसेनेच्या मुख्यमंत्री
पदास ब्रेक लागला आहे. एकंदरीत सत्ता स्थापनेस चकवा बसला आहे आणि फडणवीस व अमित शहा
यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे मानले जात आहे. “मी पुन्हा येईन” म्हणणारे फडणवीस
“पुन्हा आले आहेत”इतकेच...
No comments:
Post a Comment