Saturday, November 23, 2019

युटोपियन शुगर्स चे मोळी पूजन संपन्न


युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी या कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० या आपल्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते आज शनिवार दि. २३/११/२०१९ रोजी गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. सुरूवातीस  युटोपियन शुगर्स चे चिफ अकौंटंट श्री. मुकेश रोडगे व त्यांच्या सौभाग्यवती अश्विनी रोडगे या उभयतांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा व गव्हाणी चे पूजन करण्यात आले या प्रसंगी कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, कचरेवाडी चे सरपंच हणमंत कोळेकर, माजी सरपंच शिवाजीराव शिंदे,नागनाथ काळुंगे, बाळदादा काळुंगे,भीमा स.सा.का.मा.संचालक राजुबापू गावडे,सुस्ते येथील सरपंच आगतराव रणदिवे,पोहोरगाव येथील बाबासाहेब पाटील,खरसोळी मा.सरपंच दत्ता कांबळे, दुर्योधन दुधाळ,सुभाष मदने,श्रीमंत कदम,प्रकाश पाटील,प्रकाश कदम,औदुंबर पाटील,मा.मार्केट कमिटी संचालक खंडेराव रणदिवे,प्रकाश मोहोळकर, यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता.
     यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की, युटोपियन शुगर्स चा हा सहावा गळीत हंगाम असून या वर्षी पुरेसा व योग्य पाऊस न झाल्याने  दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ऊस लागवडी चे क्षेत्र कमी होऊन गेल्या वर्षी च्या तुलनेत यंदा ऊसाची उपलब्धता कमी आहे परंतु ऊस उत्पादकांचा विश्वास व कार्यक्षम व्यवस्थापनाच्या जोरावर युटोपियनच्या शेती विभागाकडे  अपेक्षित ऊसाची नोंद झाली आहे,गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखाना चार महीने सुरू राहील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
     पुढे बोलताना परिचारक म्हणाले की,मागील सर्वच गळीत हंगामात युटोपियन ने एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम राखत एक वेगळा आदर्श निर्माण केला असून,पुढील काळामध्येही ही परंपरा कायम राखणार आहोत.या भागातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मागील सर्व ही हंगामामध्ये युटोपियनला ऊस गाळपास देऊन सहकार्य केले होते,व या पुढील काळातही आपला सर्व ऊस युटोपियन ला गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही परिचारक यांनी केले. यावेळी त्यांनी ऊस उत्पादक व कर्मचारी या सर्वांना गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.      
            यावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० साठी तांत्रिक तयारी पूर्ण केली असून कारखान्याचा उत्पादन विभाग,यांत्रिक विभाग,हा गाळप हंगामास तयार असून अपेक्षित उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. चालू हंगाम हा आव्हानात्मक असून त्यासाठी व्यवस्थापनाने पूर्ण तयारी केली आहे कारखाना आधुनिक तंत्रज्ञाना च्या जोरावर कारखाना गाळप उद्दीष्ट निश्चित पूर्ण करेल. तसेच  सध्या दुष्काळी परिस्थिति असल्याने कारखानदारी अडचणीत आहे त्यामुळे कारखाना काटकसरीने चालविण्यासाठी युटोपियन प्रयत्नशील आहे.कारखाना ऊस उत्पादकांच्या हिताचा विचार करून ऊस उत्पादकांचे उत्पन्न व उत्पादकता वाढावी या करिता ऊस बेणे,खाते,ठिबक सिंचन,व प्रती एकरी १०० टन ऊस उत्पादना करिता वेळोवेळी तज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच कारखान्याचा  नव्याने उभारण्यात आलेला आसवनी प्रकल्प योग्य रीतीने चालू असून त्याचा फायदा ऊस उत्पादकांना भविष्यात जास्तीचा दर देण्यासाठी होणार आहे. सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण पांढरे यांनी केले.
फोटो ओळी: युटोपियन शुगर्स लि. पंत नगर कचरेवाडी या कारखान्याने गळीत हंगाम २०१९-२० या आपल्या सहाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी मोळी पूजन करताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक,कचरेवाडी चे सरपंच हणमंत कोळेकर, माजी सरपंच शिवाजीराव शिंदे,नागनाथ काळुंगे भीमा स.सा.का.मा.संचालक राजुबापू गावडे,सुस्ते येथील सरपंच आगतराव रणदिवे,पोहोरगाव येथील बाबासाहेब पाटील,खरसोळी मा.सरपंच दत्ता कांबळे,बाळदादा काळुंगे,दुर्योधन दुधाळ,सुभाष मदने,श्रीमंत कदम,प्रकाश पाटील,प्रकाश कदम,औदुंबर पाटील,मा.मार्केट कमिटी संचालक खंडेराव रणदिवे,प्रकाश मोहोळकर,कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, सर्व अधिकारी,खाते-प्रमुख,व कर्मचारी वर्ग आदि दिसत आहेत .

Friday, November 22, 2019

सत्तास्थापनेस“चकवा” शहा - फडणवीस यांची खेळी यशस्वी


महाराष्ट्र राज्याच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमतासाठी लागणारा “१४५” चा आकडा गाठता आला नाही.या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा व मित्र पक्ष यांनी “महायुती” च्या माध्यमातून तर कोंग्रेस व राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांनी “आघाडी” च्या माध्यमातून निवडणूका लढवल्या.निवडणूक निकाल लागल्या नंतर शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया दिली ती म्हणजे “सरकार बनवण्यासाठी शिवसेनेचे सर्व पर्याय खुले”आणि या ठिकाणीच खर्‍या अर्थाने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील संघर्षास सुरुवात झाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे मीडिया वर दररोज त्याच त्या वक्तव्याने नवीन  राज्यातील जनता रोजच नवनवीन अंदाज बांधत होती.सुरुवातीची अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द अमित शहा यांनी मातोश्री वर येऊन दिला होता. आता तो पाळलाच पाहिजे. सत्तेत समान वाटा व पद ही समान देण्याचे अमित शहा यांनी मान्य केले होते. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मात्र त्याच वेळी शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्या बाबत चर्चा झालीच नाही असे भारतीय जनता पार्टी,देवेंद्र फडणवीस व दस्तुरखुद्द अमित शहा यांनी जाहीर केले. त्यामुळे सत्ता संघर्षाची तीव्रता अधिकच वाढली. उद्धव ठाकरे यांनी मी शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शिवसैनिकलाच बसवणार हा शब्द दिला आहे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत आता माघार नाही असे सांगत आपल्या अस्तित्वाचा मुद्दा केला. त्यांनी भारतीय जनता पक्षा सोबत असणारे अनेक वर्षांचे संबंध संपुष्टात आणत केंद्रीय मंत्री मंडळात समाविष्ट असणारे शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांना राजीनामा देण्यास सांगितले.तोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी अधिकच वेग घेतला होता.राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी जवळीक साधत कोंग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्या करिता विचारणा पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली. शरद पवार यांनी स्वत: कोंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिति बाबत माहिती देऊन भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापणे पासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरणे जुळवावी लागतील असे सांगत सोनिया गांधी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता कट्टर हिंदुत्ववादी असणार्‍या शिवसेने बरोबर आघाडी करण्या करिता कोंग्रेस पक्षात वेग वेगळे मत प्रवाह होते. अनेक कोंग्रेस नेते यांचा या आघाडीला विरोध होता. मात्र, पवार साहेब यांनी केली जुळवा जुळव व सत्तेत समाविष्ट होण्या करीता आतुर झालेले काही आमदार यांच्या मर्जी खातर किमान समान धोरणावर महाआघाडीचे गणित जुळले. भारतीय जनता पक्षाने या आघाडीस शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षांच्या बहुतांश नेत्यांनी या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मुत्सद्देगिरी करीत आपला प्लॅन शेवट पर्यन्त ओपन केला नाही. परंतु,सत्ता स्थापने मध्ये गर्क असणारे शिवसेना नेते यांच्या डोळ्यासमोर फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्चीच होती त्यामुळे त्यांची नजर मर्यादित झाली होती. आणि नेमके याच संधीचा फायदा भारतीय जनता पार्टी ने घेतला आहे. “रात्रीस खेळ चाले”या उक्ती प्रमाणे भारतीय जनता पक्ष हा आपले सर्वच “सर्जिकल स्ट्राईक” रात्रीस खेळण्यात पटाईत आहेत.अजित पवार यांनी राष्ट्रवादी कोंग्रेस ला सोडून भाजपा ला समर्थन देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिवसेनेच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राज्यातील राजकारणे वेगळीच दिशा घेतली असून सुप्रिया सूळे यांनी आमचा पक्ष यांनी घर फुटले असल्याचे संगितले आहे.
आता पुढील हालचालींवर लक्ष ठेवून भारतीय जनता पार्टी आहे . मात्र शरद पवार यांना हा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
असे असले तरी शरद पवार यांनी दोनच दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकरी प्रश्नासाठीभेट घेतली होती ,मात्र यावर खरोखरच नेमकी शेतकरी प्रश्नावरच चर्चा झाली होती का असा प्रश्न निर्माण होतोय.येणर्‍य काळात अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष कारवाई करेल ,मात्र महाआघाडीच्या सत्ता स्थापनेस व शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदास ब्रेक लागला आहे. एकंदरीत सत्ता स्थापनेस चकवा बसला आहे आणि फडणवीस व अमित शहा यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे मानले जात आहे. “मी पुन्हा येईन” म्हणणारे फडणवीस “पुन्हा आले आहेत”इतकेच... 



Monday, November 18, 2019

युटोपियनचे शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न







युटोपियनचे शुगर्स चे बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न
युटोपियनचे शुगर्स चे चालू गळीत हंगामा करिता ४ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक
 मंगळवेढा प्रतिनिधी:- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्या च्या २०१९-२०२० या सहाव्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन गुरुवार दि.१४/११/२०१९ रोजी पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख मा.सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ह.भ.प.मदन महाराज हरीदास,युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या समवेत कारखान्याचे सर्व अधिकारी, खातेप्रमुखव कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
     सुरूवातीला कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर श्री.महेश निंबाळकर यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
     यावेळी बोलताना युटोपियन शुगर्स चे संस्थापक चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,युटोपियन चा हा सहावा गळीत हंगाम असून  सुरुवाती पासूनच ऊस उत्पादकांच्या हितास प्राधान्य देण्याचे काम युटोपियन शुगर्स ने केले आहे. त्यामुळेच आम्ही ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.भविष्यामध्ये या कारखान्याचा कणा असणारे ऊस उत्पादक व कर्मचारी यांच्या हिताचा विचार करून भविष्यामध्ये अनेक लाभदायी योजना राबविण्याचा प्रशासनाचा मानस आहे.मागील गळीत हंगाममध्ये ऊसाची उपलब्धता प्रचंड होती. परंतु चालू वर्षी दुष्काळी परिस्थिति असल्याने ऊसाची उपलब्धता कमी प्रमाणावर आहे.त्यामुळे कारखानदारांसमोर अडचणी आहेत त्यासाठी कारखाना काटकसरीने चालविणे ही काळाची गरज आहे.अशा परिस्थितीत ही युटोपियन ने ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला असल्याने चालू गळीत हंगामात युटोपियन शुगर्स हा ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा आशावाद कारखान्याचे संस्थापक-चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केला.तसेच चालूगळीत हंगामाकरिता युटोपियन च्या कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युटोपियन शुगर्स  चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले.

फोटो ओळी: युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन पूजन करताना पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख मा.सुधाकरपंत परिचारक, ह.भ.प.मदन महाराज हरीदास, चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांच्या समवेत कारखान्याचे सर्व अधिकारी, खातेप्रमुखव कर्मचारी वर्ग दिसत आहे.